ओंजळीत मैदानाच्या
धूसर धुके साठलेले...
गुंफेत हृदयाच्या
जणू आनंद दाटलेले...-
√ Instagram Name 👉 @ganeshpawar_05
√ 🎂Wish me on September
√ Quotes Lov... read more
खिशात कितीही नोटा असल्या तरी नशिबाचा टॉस करायला रुपायात लागतो.
पतंग आणि व्यक्ती जास्त हवेत गेला की त्याचा पत्ता आपोआप कट होतो
वय आणि पैसा सौंदर्य यावर कधीच गर्व करू नये.
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात.-
अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे...
सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे...
आली गेली कितीही संकटे तरीही...
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे...
-
....💟कुणीतरी हवं असतं.💟....
कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देणार
हातात हात घेऊन , शब्दांशिवाय बोलणार...
कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देनार
फुलातल्या सुगंधासारख,आयुष्यभर जपणारं...
कुणीतरी हव असत ,हक्कान रागवणार,
चुका झाल्या तरी,मायेन समज़ावनारं...
कुणीतरी हव असत ,आपल म्हणणारं
नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार...
कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार,
कशीही वाट असली तरी,मागे न फिरणार...
कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार,
कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासोबत रमणार...
कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार,
स्वतःच्या दुखाःतही,मला सामावुन घेणार...
कुणीतरी हव असत,एकांतही रेंगाळणार,
माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असणार...
कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार,
माझ्या विश्वासाला कधीही न फसवणार...-
"साथ"
मेल्यावर स्वर्ग नको आम्हास,
जिवंतपणी यश पाहिजे...!
क्रियेला गर्दी नको माणसांची,
जिवंतपणी मित्रांची साथ पाहिजे...!
-
आयुष्य
आयुष्यभर सोबत असून, जवळ कधी बसतं नाही.
एकाच घरात राहून आम्ही, एकमेकांस दिसत नाही.
हरवला तो आपसातला, जिव्हाळ्याचा संवाद.
एकमेकांस दोष देऊन, नित्य चाले वादविवाद.
धाव धाव धावतो आहे, दिशा मात्र कळत नाही.
हृदयाचे पाऊल कधी, हृदयाकडे वळले नाही.
इतकं जगून झालं पण, जगायलाच वेळ नाही.
जगतो आहोत कशासाठी, काहीच कसला मेळ नाही.
क्षण एक येईल असा, घेऊन जाईल हा श्वास.
अर्ध्यावरच थांबलेला असेल, आपला जीवन प्रवास.
अजूनही वेळ आहे, थोड तरी जगून घ्या.
सुंदर अशा जगण्याला, डोळे भरून बघून घ्या.-
वर्ष नवीन आहे
वर्षातील दिवस पण नवीन आहे
आयुष्यातील वळ्णे सुद्धा नवीन आहे
पण प्रेम मात्र जुने आहे
बघ तुला हवं तर जून प्रेम
नव्याने करता येईल
-
"तू असावा सोबती"
छंदात छंद मला तुझा असावा
चित्रात माझ्या रंगही तुझा असावा
सोबत असो वा नसो कोणी
तुझा हात सदैव माझ्या हातात असावा
जरी गेली कुठे तिथे गंध तुझा असावा
असे मी कोणत्याही दुनियेत तिथे दंग तुझा असावा
जरी भेटले अनेकजण मला
जीव हा माझा तुझ्यामध्येचं गुंतावा
घेऊनी झाडाखाली क्षणभर विसावा
जिथे शांततेचा भंग नसावा
घेतली जरी वामकुक्षी तिथे
नजरेत माझ्या तुझाच चेहरा असावा-
लोक काय म्हणतील या वाक्याने जेवढे स्वप्नांचा खून केला आहे ना
तेवढं कोणत्या दुसऱ्या गोष्टीने केलं नसेल
-
समुद्र लाटांच्या भीतीने, बोट दुबत नाही.
जे प्रयत्न करतात, ते कधीही हार मानत नाही.
-