सरत्या या वर्षाने खूप काही प्रसंग दाखवलेत
अन् खूप अनुभव ही दिलेत
ज्यांचा कधी स्वप्नांत ही विचार केला नाही...
त्यांसोबतच कसं तोंड द्यावं साऱ्यांना,
कसं स्वतःच स्वतःला सावरावं हे देखील शिकवलं...
आयुष्यात येणाऱ्या नवीन व्यक्तीला
मनाविरुद्धच पण त्याच्या हक्काचं प्रेम त्याला द्यावं,
मनातील दुःख लपवून, डोळ्यांतील पाणी गिळून
ओठांवर कसं हसू फुलवावं हे सुद्धा शिकवलं...
माझ्या जिवलग व्यक्तीपासून,
जी व्यक्तीच माझं सारं आयुष्य होती
तिच्यापासून मला दूर तर केलंच,
पण एकदा मनात बसवलेल्या त्या व्यक्तीला कसं विसरावं,
त्याच्या आठवणींना,
त्याच्यासोबत वावरलेल्या त्या सोनेरी क्षणांना कसं दूर सारावं,
त्याच्या शिवाय हे आयुष्य कसं जगावं,
हे शिकवणं मात्र या सरत्या वर्षाला जमलंच नाही...
-