नको रे बाळा, दूर जाऊ
भीती दाटते
अनवाणी पायी तुझ्या
बोचती काटे कुटे
माय तुझी पदरास
बांधू पाहते
मनं तुझे रे आभाळी
स्वप्नी रंगते
झेप घेरे बाळा, तुज
नभ पडो थिटे
माय बाप राखती
उबदार घरटे
पिल्लू घरी परतावे
मनी वाटते
आस लावुनी, माय
उंबऱ्याशी थांबते
गौरवी-
हिरव्या रानी उगवली प्रभात ,
शिरशिरी उठे अंगात
तव स्पर्शाची ओढ मनात,
सोबत तो अवखळ एकांत
डोंगर कपारी तो नागमोडी घाट
प्रियास भेटण्या रे निसर्गा... अडवू नको माझी वाट
-
शब्दांच्या पल्याड, तू पाहसी
भाव त्यातले जाणून घेसी
परिणीता तू, संसारी रमसी
माय माऊली, पिलांस जपसी
कांता तू, सहचरीता होसी
धैर्य धरुनी तू, वाट चालीसी
सौख्याच्या कणाकणांना
मनांत तू, टिपूनी घेसी
आयुष्मती तू सुखी रहावे
सदिच्छा असे मनीची ऐसी
-
पडता मनी मायामोहाचा गुंता
फोल ठरते मनीची अस्मिता
मन गुंतून पडता मायाजालात अपार
शिरावरी पडे प्रारब्धाचा प्रहार
आभासी जगात या सुखाची आस
परी प्रत्यक्षात पडे दुःखाचा फास
जाग येते मनुजा त्या क्षणी एका
गुरु देई जेव्हा ज्ञानाने दणका
जागवावे मनी एकच ते तत्व
तारील ते भवसागरी हरिनामाचे महत्व
🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹
-
आज कोरोनाचे राज्य आहे जगावर,
म्हणून सारे आले समान पातळीवर
आता ना जात पात ना पक्ष ना देश
असाच राहु दे माणसात माणुसकीचा आवेश-
एक पत्र शाळेला
प्रिय आदर्श शाळा,
३२ वर्ष झाली आम्हां पाखरांना तुझ्या फांदीवरून झेप घेऊन....आपापल्या कुवतीप्रमाणे विश्वाच्या आकाशात झेपावली पाखरे...पण तू कधीच डावं-उजवं केलं नाहीस, तुझ्या साठी सगळेच सारखे होते- आदर्श चे विद्यार्थी-विद्यार्थिनी
-
शाळा
शाळेत जाण्याआधी होते मनाचे पान कोरे शिकता शिकता अनेक रंग गवसले मनी भरणारे
-
बालपणाची मैत्री म्हणजे वाटायची सोबत
मोठे झाल्यावर मैत्री, अभ्यासात मदत
आता एवढ्या वर्षांनी समजते, मैत्रीतली गंमत-