पुरे झाले हे आशा अपेक्षांचे ओझे!
दररोज येणारा नवीन दिवस आणतो
नवीन संधी, नवीन शक्ती, नवीन उर्जा,
नवचैतन्य, नवीन कार्य, अशी नवी नवलाई.
ही नवलाई आणते नवी आशा,
आव्हाने आणि स्पर्धा.
त्या नाविन्यात दडलेली असते सुप्त इच्छा.
सर्व जगात सुप्त इच्छेने घडणारे अहंकारादी षडरीपू
दाबतात माणसाच्या मर्यादा.
मर्यादेपलीकडे जात माणूस हा मानव राहिला नाही.
सर्वांसाठी म्हणता म्हणता धरणी हळूच लाटली.
वाटले की काळ दाटला माणसांचा भार वाढला
नश्वर देह तयाचा, त्याला तो ही थाट वाटला
करूनी सारा संसार उद्धवस्त म्हणे तर विकास साधला.
-