दसऱ्याच्या काही राहून गेलेल्या शुभेच्छा
सकाळपासून उन्हात थांबलेल्या फुल विकणाऱ्या सर्वांची फुलं विकली जावी या शुभेच्छा.
शेजारणी ने कुटुंबासाठी केलेला भरगच्च स्वयंपाक पाहून आपल्याही कुटुंबाला एकदा असच खाऊ घालता यावं यासाठी त्या गृहिणीला शुभेच्छा
मित्राने घेतलेली bike बघून, आपणही एक दिवशी अशीच bike घेऊ म्हणणाऱ्या तरुणाला शुभेच्छा..
बरेच दिवस बायकोला काही घेतलं नाही रे...त्यांनाही आपल्या सौं ना आज काहीतरी घेता यावं यासाठी शुभेच्छा..
मटणाच्या दुकानावर मरणाची बात बघत थांबलेल्या सर्वांच आयुष्य किमान एका दिवसाने वाढावं या शुभेच्छा..-
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान लिहून झाले परंतु २६ जानेवारी १९३१ रोजी पहिल्यांदा स्वतंत्र दिवस साजरा केला होता तसेच पहिल्यांदा राष्ट्रीय ध्वज फडकवला होता, त्या दिवसाची आठवण म्हणून पहिला प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी १९५० रोजी साजरा केला.
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा-
तिने मखमली स्पर्श केला गुलाबाला
अन त्याच्याही अंगावर काटा आला
तिने हळुवार घेतला त्याला ओंजळीत
अन तो वेडा लाजून लाल झाला
-
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान लिहून पूर्ण झाले. परंतु २६ जानेवारी १९३० रोजी काँग्रेस चे लाहोर येथे अधिवेशन झाले होते त्यात पं. नेहरूंनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्या अधिवेशनात तिरंगा ही फडकवण्यात आला होता. त्या दिवसाची आठवण राहावी म्हणून नंतर तीन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० रोजी आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. आणि संविधान अंगीकृत करण्यात आले.
#संविधान_दिन-
समस्या कोणतीही आणि कितीही गंभीर असली तरी पुरुषांना त्यावर कधी परिस्थितीचा, कधी हास्याचा, कधी संयमाचा बुरखा चढवण्याचं सामर्थ्य असतं, त्यामुळे आयुष्यभर त्यांच्या जखमा कोणालाच कळत नाहीत.
जागतिक पुरुष दिन-
पहिली भेट ♥️
आठवते आपली पहिली भेट
जेव्हा मी जास्वंद दिलं होतं
गुलाबाच्या ऐवजी तेही
तुला तितकंच भावलं होतं
तू विचारलं मग, काय खाऊया?
मी म्हणालो त्या आधी आपण
एकमेकांना डोळे भरून बघून घेऊया
मग आपण ice cream खाल्लं होतं
खाताना ते थोडं तुझ्या नाकाला लागलं होतं
मग तू विचारलंस गुलाबा ऐवजी
जास्वंद का आणला?
मी म्हणालो गुलाब सगळेच देतात
मला तुझ्यात त्याचा सुगंध जाणवला
मग तू हळूच गालात लाजली होती
अशी आपली पहिली भेट खूपच खास होती-
अति लघू कथा (अ.ल.क)
लग्नसोहळ्यात नातेवाईक तिला म्हणाले, किती दिवस खोटे दागिने घालणार, एखादा दागिना करून घे.
ती हसली, आणि आपल्या मुलाकडे बोट दाखवून म्हणाली, तो समोर माझा चालता बोलता दागिना आहे ना त्यासमोर सगळे दागिने फिक्के आहेत.
आपल्या मुलाची कुवत तिने कधीच ओळखली होती-
भरगच्च किराणा भरून फराळ बनवणारी आई
आणि
लोकांनी दिलेल्या फराळावर दिवाळी साजरी करणारी आई
दोघीही हसल्या की तितक्याच श्रीमंत दिसतात
♥️♥️♥️-
ऐलतीर पैलतीराशी अचानक भेटू लागला तर?
आणि तरीही पैलतीर ऐलतीराशी अनोळखी वागला तर??-
नवरात्रीत पायात चप्पल न घालणाऱ्या भक्तांनो चपला काय सोडता. हिंमत असेल तर व्यसनं सोडा, अज्ञान, अंधश्रद्धा सोडा, वाईट वागणं सोडा, व्यवहार बुडवणं सोडा, दुसऱ्याला नाहक त्रास देणे सोडा, दुसऱ्यावर जळणे सोडा, एकमेकांचा राग, व्देष,तिरस्कार, करणं सोडा, अमानुष पणा सोडा,-----बघा जमलं तर...! एक वेळ भक्त नाही होता आलं तरी चालेल!! पण माणूस खात्रीने नक्कीच व्हा.!!
आई राजा उदं उदं 🚩-