सह जिवन🏵️
तिस वर्षाच सहजिवन आपल
कळलंच नाही एकमेकांच्या
साथीने एवढ अंतर कधी कापल
कष्टाने केली संसाराची उभारणी
सोडली नाही हिंमत कधी
जरी आली दुखणी खुपणी
कधि वेचली चांदन पदरात
कधि अनवनी चाललो
तापल्या उन्हाळ्यात.
सुखाल मानल कृपा देवची
दुःखाला आपल प्रालब्ध
पण त्यामुळेच तर झाल
आपल जिवन समृध
आयुष्य च्या संध्याकाळी निरामय
जावी देवाणी माझी एवढी मागणी
पुरवावी हीच ईश्वर चरणीं प्राथना-
सहज सुचल
मला पाहिजे तस तुझ रूप
मनात गृहीत धरायला नको होत
वेड्या सारखं नको तेवढं
मृगजळामागे पळायला नको होत-
अशी पाखरे येती अन
आठवण ठेवुनिया जाती
चार दिवसांची रंगत सांगत
चार दिवसांची नाती
अशी पाखरे येती अन जाती..!-
आज नात्यात माझ्या
जगले युग क्षणाल
होतास तु सोबतीला आजही
नात्यात माझ्या फुलते तुझीच प्रिती.
गंध वेडी मि खरी
कस्तुरी मृगा परी
धावते मागुन मी
पुढे तुझी समृती.
चांदण्याच्य रात्रीला
वाऱ्यात गाणे घुमती
म्हणतात लोक आजही
रानात गाते प्रिती.
भेट न झाली तुझी
लोटली युग किती
नाही मि स्वतः स भटलो
काळ लोटला किती.
ये कधी भेटायला
मोकळ्या राणात ती
आजही नात्य त माझ्या
फुलते तुझी च प्रिती-
मातीत पाउस.
काल परवा इथं
पडला नव्हता पाऊस
पुर नदिच्या डोहात
कसा आल इथं
कधि थांबला कधी आला
कधि वादळ वाऱ्यात
जिव आदमरा झाला
तुझा टपोऱ्या मारान
भुईसंग आभायाची
प्रितीची गाठ भेट
भर पाऊसाळ्यात
बिलगले पाणाला देठ
आली सरीवर सरी
कसी फुलली माती
तुझ्या माझ्या वोलाव्यान
नवि फुलली नाती
ओल्या वावरात
केली पाखरानं बोबं
गाव धावले पाहयला
ऊगवले मातीत कोबं-
मैत्री
पिपळाच्या पाना सारखी.
ज्याची जाळी कितीही बारीक असली तरी,
आपल्या जीवनात गुंतून असणारी-
मैत्री
हृदयाच्या झऱ्यातून वाहणाऱ्या,
प्रेम रुपी पाण्याचा निखळ
खळखळाठ म्हणजे मैत्री.-
काटा
काट्याला फक्त
टोचायच कळत,
त्याला काय माहीत
समोरच्याला वेदना होतात,
आपणच चालताना
सांभाळून चालायचं असत,
काट्याला फक्त टोचायच कळत.-