प्रेमात कधीच मोजमाप करायचे नसते
सढळ हाताने फक्त देत जायचे असते
देताना कधीच आकडेमोड करायची नसते
घेणाराला दिले तितके कमीच पडत असते
देणाऱ्याची ओंजळ कधीच रीती रहात नसते
देतांना मनात निःस्वार्थ भावना हवी असते
प्रेमाचा कधीच मोल भाव करता येत नसतो
प्रेम निर्मळ, निःस्वार्थ भावनांचा खेळ असतो
-