एक कोमल कळी, पडली वासनेला बळी
ती नाजूक तार होती, जीवनाचा आनंद घेतं होती
दुष्ट नजर लागली अन, फसवू लागली सगळी
विश्वास डोळे झाकून तीने, समाजावर ठेवला होता
त्याचं समाज कंटकांनी, गळा तिचा घोटला होता
थांबलेला पाहुन तिचा श्वास, वाढत गेला त्यांचा ध्यास
एक दोन तीन नव्हे, कैक कळ्या अशाच खुडल्या
धाय मोकलून तेव्हा, बाया बापड्याही रडल्या
हिचं वेळ योग्य होती, कळीला मजबूत करण्याची
नजर भेदता यायला हवी, साऱ्या दुष्ट नियतीची
गरज आहे समाजात, मुलींना शिक्षण देण्याची
अन असावी जोड त्याला, स्व संरक्षण प्रशिक्षणाची
तेव्हाचं होईल बदल जेव्हा, मुली खंबीर होतील
नव्या पिढीची नव्या दिशेची, सुरुवात नक्की होईल...
-