वही
मी आज बैसलो होतो, चाळीत जुनी ती पाने
होते मोरपीस वाळलेले, जे होतेस दिले प्रेमाने
ती एक जुनी कविता, तुझ्यासाठी होती लिहिली
वाचलीस ओठी तुझ्या, त्यातील ओळ ती पहिली
खूप काही तुझ्यावरती, होते त्यात लिहिले
कागदावर रूप तुझे, होते त्यांत पाहिले
पलटताना पाने वहीची, सुगंध तुझा यावा
आपसूक जसा हाताला, स्पर्श तुझा व्हावा
जाहली जीर्ण पाने, तरी तरुण अजुनी ओळी
राहावे तरुण प्रेमही, हीच भावना भोळी
म्हणूनच बहुदा वही, ठेवली जपून असावी
असंच चाळत असता, पानातून तू दिसावी
तू, मी आणि वही, काही औरच आहे बात
लपलेली तू , ओळींत,शब्दांत अन पानापानात....
.....अनिमिष
-
कीधर जाता है दिल...
कीधर जाता है दिल, उसे खुद्द ही पता नही,
हर पल करे सिर्फ तूम्हे याद, ये तेरी खता नही
मुद्दते हो गई तुम्हे भुलाए, फिर भी ये किसका है साया
खुली रहे या बंद, वो चेहरा आंखो से जाता नही
क्या करू, कैसे समझाऊं, मैं इस दीवाने आशिक को
तुझे भी तो ऐ जालिम, इसका मुस्कुराना भाता नहीं
इश्क हम दोनो ने, किया तो एकजैसा ही था
मगर तूने जो किया, मुझे वो आता नही
कबतलक ये ज़ख्म, सिने में लिए जिएंगे
लगता है इस जिस्मसे, रुहका कोई नाता नहीं
मिट जायेंगे इक दिन यूंही, राह तेरी देखते हुए
गिरे हुए पत्तों के सिवा, अब कोई मिलने आता नही.....
....अनिमिष
-
शब्दांच्या भावना
खूप काही लिहिण्यासारखं, मनामध्ये असतं
तरी सुद्धा का म्हणून, मन शून्यात जाऊन बसतं
घेऊन बसतो नुसताच, कागद व लेखणी हाती
लिहिताना मात्र शब्द, धूसर होऊन जाती
मी म्हणतो शब्दांना, आज झाले तरी काय
मनातील भावनांची, सांगा चूक तरी काय
मन तर वेडंच हे त्याचं, नेहमीचंच असतंय ना
भावना दाटल्या तरंच, लिहिणं सुचतंय ना
मग तुम्ही आज का, एवढा विचार करताय
लाजत लाजत का, असे कागदावर उतरताय
शब्द म्हणती मला, काय कसे सांगावे
आम्हीच आमच्यासाठी,अर्थ कसे शोधावे
येतो कधी कधी, आम्हालाही कंटाळा
घालावा वाटतो आम्हालाही, स्वतःवरती आळा
तुझ्यासाठी तर आम्ही, शब्द आहोत फक्त
अर्थ जर देशील थोडा, वाहील त्यातुनही रक्त
आता कळले मला, अर्थ असावा मौनांना
शब्द असतील निरर्थक, महत्त्व काय भावनांना
कळून चुकले मर्म सारे, लेखणी आणि कागदांना
निवडून, पारखून, हळुवार, अलगद वेचावे शब्दांना
......अनिमिष
-
परत
परत तोच पाऊस, परत तीच कातरवेळ
परत तोच सुरु होतो, तुझ्या आठवणींचा खेळ
परत तोच गारवा, परत त्याच कोसळधारा
झोंबुन जातो उगाच, खट्याळ गार वारा
परत एकदा तीच, गर्दी ढगांची आकाशी
तेच त्यांचे भांडण, सतत एकमेकांशी
परत तीच एक, वीज मधेच चमकणारी
चमकत असता एकदम, मधेच कधी कडाडणारी
परत एकदा तीच, आठवण तुझी असल्याची
आठवणी सारखीच माझ्या, सोबत तू नसल्याची
परत तेच मनाचे माझ्या, सुरू होते वेडेपण
लोकांच्या गर्दीमध्ये उगाच, हिंडे माझे एकटेपण
परत नको म्हणूनतर, असा कातरवेळी पाऊस
शोधून अशी कारणे, नको आठवणीत येऊस
.....अनिमिष
-
वाटले
आज जेव्हा लिहू वाटले, तुज तेव्हा आठवू वाटले
लिहित असता आठवून, तुज मनी साठवू वाटले
हळूच शब्द सारे, मनी गुंतत जाती
लेखणीतुन त्यांना, कागदी पाठवू वाटले
पावसाळी गार वारा, फिरु लगे सैरावैरा
बहुदा आपुल्या आठवणींना, त्यास गोठवू वाटले
आठवणीने तुझ्या, डोळे पाणावले जसे
तरळले सौंदर्य समोरी, आसवा आटवू वाटले
जमले कधी एकदा, भेट येऊनी जराशी
पाहुनी शेवटचे तुला, डोळे मिटवू वाटले.....
....अनिमिष
-
असं माझं मन
शब्दात वर्णता नं येणारं, असं माझं मन
मलाच कधी नं कळणारं, असं माझं मन
नेहमीच शब्दांत त्यांचा, अर्थ शोधत असतं
शोधता स्वतःच गुंतणारं, असं माझं मन
प्रतिबिंब पाण्यामध्ये, पडले असता कधी
हळुवार डोलणारं, असं माझं मन
हळूच एखादी झुळूक, गार वाऱ्याची येई
गुज पावसाचं सांगणारं, असं माझं मन
येई सर पावसाची, मृदगंध दुर दरवळे
प्रफुल्लीत होऊनी भिजणारं, असं माझं मन
बरेच काही सांगायचे, बरेच काही ऐकायचे
नं सांगताच समजणारं, असं माझं मन
उदास होता कधी, कावरे बावरे होई
स्वतःला स्वतःच संमजवणारं, असं माझं मन
....अनिमिष
-
मनपाखरू
कधीतरी एकदा असंच, आभाळ येऊन दाटलं
तुझ्यासाठीच आलंय भरून, असं तेव्हा वाटलं
मन माझं आहेच वेडं, सर्वत्र फक्त तूच दिसते
नसताना देखील फक्त, जवळ माझ्या तूच असते
सवय तुझ्या असण्याची, झाली बघ कीती
कविता असते कागदावर, अन हात तुझा हाती
माझ्या प्रत्येक लिहिण्यात, फक्त तुझं असणं
जसं अलगद फुलावरती, फुलपाखराचं बसणं
काय खरंच गुपीत आहे, मलाही कळत नाही
'तू' असं लिहिल्याशिवाय, लेखणी वळत नाही
कसं काय कुणावरती, जीव एवढा जडतो
कळलंय हे मलाही, तुजवाचून जन्मच अडतो
तुझ्या पासून झाला, हा काव्य प्रवास सुरू
तुझ्यापाशी येऊन थांबेल, भरकटलेलं मनपाखरू
.....अनिमिष
-
साथ
आजही दिसते तशीच, पहिल्यांदा तुला पाहिलं होतं
गोंडस तुझं रुप मनात, घर करुन राहिलं होतं
मला नेहमीच असं वाटतं, प्रश्न पडतो स्वतःला
खरंच सांग मनापासून, माझ्यात काय पाहिलं होतं
असं कधीच वाटलं नव्हतं, कोणी तुझ्यासारखं भेटेल
ह्या कोऱ्या कागदावर बहुतेक, नाव तुझंच लिहिलं होतं
विश्वास माझा माझ्यावरच, होता बसेनासा झाला
ह्या काळ्या पाषाणावर, गुलाब कोणी वाहिलं होतं
या उनाड वाऱ्याला कोणी, बंदिस्त कसे करणार
तूच होती ती की जीला, अशक्य हे जमलं होतं
तुझ्या येण्याने बसली बघ, घडी विस्कटलेल्या आयुष्याची
अस्ताव्यस्त जीवन माझं, तुझ्यामुळेच तर सावरलं होतं
इथून पुढेही अशीच राहो, साथ सात जन्मांची
म्हातारपणी हातात हात, स्वप्न तेव्हाच मी पाहिलं होतं
.....अनिमिष
-
देवाची चूक
कधी वाटे विचार हा, देवालाही आला असेल
तुला पाठवून धरणीवर, पश्चाताप झाला असेल
तुला बघून कधी कधी तो, आतल्या आत जळत असेल
मीच बनवले का हिला, स्वतःलाच विचारत असेल
तुझ्यासारखी मूर्ती त्याने, क्वचितच असेल बनवली
इंद्रधनूच्या सप्तरंगाने, मनसोक्त असेल रंगवली
आश्चर्य आहे माझे नशीब, त्यानेच का असेल लिहिले
चुकून का होईना तुला, फक्त माझ्यासाठी धाडले
इतरावतो मी जेव्हाही, तू सोबत माझ्या असते
विसरतो त्यालाही जेव्हा, हातात हात घेऊन बसते
माफ कर देवा हिच्यासमोर, मला विसर तुझा पडला
हिला पाठवले हा गुन्हा, खरं तुझ्याकडूनच तर घडला
चुकूनच का होईना देवा, चूक अशीच होऊ दे
प्रत्येक जन्मी माझ्यासाठी, जन्म हिला घेऊ दे
.....अनिमिष-
शृंगार
आजवर ना कळले मला, तू शृंगार एवढा का करीशी
जखम झालेली नजरेनी, ना तुजला का पुरेशी
का रंगवुन त्या ओठांना, समोर माझ्या येशी
नजर कशी मी रोखू, का जीव माझा घेशी
भुवयांचे करून बाण, निशाणा तू साधीशी
काजळ भरून पापणीने, जीवघेणी लाजशी
गर्द काळ्या केसांमुधुनी, लट एक झुलावी
गलांवरती उडता हळूच, ओठांवरती टेकावी
ओठांच्या त्या लाल काळ्या, हसताना हळूच खुलती
मी स्तब्ध होऊनी बघतो, नजरा नजरेशी बोलती
तुला अशी बघून काळजाचे, पाणी पाणी जाहले
तुझी होते गंमत थोडी, शहिद बघणारे जाहले
अशी सखे सजून तू, माझ्या समोरी येऊ नकोस
घायाळ तर केलेच आहे, जीव माझा घेऊ नकोस
करायचेच असेल तुला, तर एकंच फक्त कर
जो ही करशील शृंगार, तो माझ्यासाठीच कर
.....अनिमिष
-