amol nannaware   (Amol M Nannaware)
92 Followers · 230 Following

हमे तो वो पसंद है जो कभी मिलेगा ही नहीं.. vision IAS
Joined 29 July 2019


हमे तो वो पसंद है जो कभी मिलेगा ही नहीं.. vision IAS
Joined 29 July 2019
4 APR AT 18:45

जर आपल्याला आपल्या जीवनात शांती हवी असेल तर दुसऱ्यांना बदलविण्याची अपेक्षा ठेवू नका.
तर स्वतःला बदलविण्यात वेळ घालवा.
कारण उन्हाची किरणे पडू लागली तर स्वतः सावली शोधावी लागेल ना की सूर्याला झाकण्याचा व्यर्थ प्रयत्न.

-


4 MAY 2022 AT 10:01

// इन्सान हमे बनना है //
मत बाँटो हमे मजहबमे इन्सान हमे बनना हैं,
रास्ते तो कई हैं यहाँपर हमे बस इन्सानियत चुनना हैं..
महफ़ूज थे माँ कीं गोदमे बाहर आये तो धर्म मिले,क्या हिंदु, क्या मुसलमान
बचपन में तो साथ खेले...
पेट है जिसका खाली वो मजहब है रोटी मानते ,प्यारसे रहते साथ साथ लढना कहाँ है जानते..
दुखावो ना दिल किसिका अल्ला,भगवान कहॅते हैं,प्यारकीं हो बात जहाँपर सारे ईश्वर वहाँ रहते हैं..
जिंदगीका फुल यारो बस एकबारही खिलता हैं,
नफरतसें ना जिओ ऐसें
बदले प्यार के प्यार मिलता है.

-


16 APR 2022 AT 10:09

नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं आयतं पाहिजे....!!!!
वीज कधी वाचवणार नाही
बील मात्र माफ पाहिजे....!!!!
झाड एकही लावणार नाही
पाऊस मात्र चांगला पाहिजे....!!!!
तक्रार कधी करणार नाही
कारवाई मात्र लगेच पाहिजे....!!!!
लाचेशिवाय काम करणार नाही
भ्रष्टाचाराचा मात्र अंत पाहिजे....!!!!
कचरा खिडकीतून बाहेर टाकीन
शहरात मात्र स्वच्छता पाहिजे....!!!!
कामात भले टाईमपास करीन
दर वर्षी नवा वेतन आयोग पाहिजे....!!!!
जातीच्या नावाने सवलती घेईन
देश मात्र धर्मनिरपेक्ष पाहिजे....!!!!
मतदान करताना जात पाहीन
जातीयता मात्र बंद झाली पाहिजे....!!!!
कर भरताना पळवाटा शोधीन
विकास मात्र जोरात झाला पाहिजे....!!!!
नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं आयतं पाहिजे....!!!!

-


1 JAN 2022 AT 10:42

*काही काम राहून गेली असतील .... काही स्वप्न ❤️ अधुरी असतील.... नवी उमेद घेऊन परत स्वप्न पाहूया....प्रयत्न करुया.... आणि ती स्वप्नं पूर्ण करून दाखवू या 🙏*

*काळजी आणि प्रेम करणारी लोकं आपल्या सोबत आहे, मग काहीच अशक्य नाही, हे धोरण मनी बाळगूया...... आपल्या सोबत घडणारे प्रत्येक प्रसंग( चांगले किंवा वाईट) हे आपल्याच फायद्याचे असतात, हा विचार केला ना, तर आयुष्य फार सोप्पे आहे. ❤️❤️*

*यावर्षी दोन मार्गाने किंवा चार मार्क्स ने अपयश आलेल्या माझ्या मित्रांना एकच सांगेन सूर्य रोज संध्याकाळी मावळतो नक्की पण सकाळी त्याच तेजाने उगवतो म्हणून जीवनाच्या रंगमंचावर खचून न जाता पुन्हा तयारी करा नक्की तुमचे स्वप्न पूर्ण होईल*

*नवीन वर्षाच्या हार्दिक सुभेच्छा*

-


23 DEC 2021 AT 10:26

बाप माझा शेतकरी खातो खातो कष्टाची भाकरी...
काय सांगू मी ही व्यथा तुम्ही समजून घ्या ही कथा...
माझा बाप शेतकरी आहे जगाचा कैवारी....
ढग येई वारा येई काय करील तो बिचारा....
सांगा तुम्ही कसा आहे दीनदुबळा हा शेतकरी....
बाप माझा शेतकरी कष्ट सारे त्यांच्या हाती...
काळ्या मातीचे हे रान तिथे सर्व त्याचे मन....
नाही उन्हाच कधी भान काळी आई त्याचा प्राण...
बाप माझा शेतकरी त्यांच्या कष्टाची जाण कोण करी...?
जग सर्व त्यांच्या जीवावरी पन त्याची किंमत कोण करी....?
तळपळतो उन्हावरी पिकवतो हिरवं सोन भारी....
बाप माझा शेतकरी सदा नांगर त्यांच्या हाती...
कोण आहे त्याची नाती गोती कधी मिळेल त्याला विश्रांती...
त्यांच्या जीवनात आहे कि नाही सुखशांती...
बाप माझा शेतकरी खातो कष्टाची भाकरी खातो कष्टाची भाकरी..... 🙏
//या कृषिप्रधान देशातील कृषी मालकांना समर्पित//
✍️An🙏

-


2 OCT 2021 AT 16:25

क्षेत्र कोणतेही असो ...... तुमचा प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी करणारी एक लॉबी तयार होते ...... ही लॉबी तुमचे कधीही चांगले होऊ देणार नाही ...... त्यामुळे तुमचा प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी अटळ आहे ....... हा काळ तुमच्यासाठी परीक्षेचा असतो ...... त्याकाळात धैर्याने सामोरे जा ...... 100 लोक तुमची बदनामी करत असतील तर 10 लोक तरी तुम्हाला चांगले म्हणतील ...... वाईट, बदनामीच्या काळात तुम्ही केलेले चांगले काम तुम्हाला तारून नेईल ..... अशा काळात काहीजण पडद्यामागून तुमची मदत करतील ...... तुम्ही केलेल्या कामाची हीच पोहोच पावती असेल ..... त्यामुळे नेहमी स्वतः ला सांगत जा की स्पर्धा अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही ......
✍️An🙏

-


1 OCT 2021 AT 7:30

यश हे अपघातानं मिळत नाही. त्या साठी परिश्रम , मांडणी , शिकणे , अभ्यास , त्याग आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तु जे काही करताय त्यावर प्रेम असनं अतिशय गरजेच आहे.. तेव्हा सर्व शक्य आहे... अनुभवाचे बोल.. 🤔
✍️An🙏

-


30 SEP 2021 AT 21:32

महत्व याला नाही की कोण
रोज आपल्या सोबत आहे.....?

महत्व याला आहे की
गरज पडल्यावर
कोण आपल्या सोबत आहे....!!!!
✍️An🙏

-


22 AUG 2021 AT 8:57

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर
कोणताच मार्ग उरत नाही..
सगळीकडे अंधार मग
प्रकाश कुठेच रहात नाही...
म्हणून आत्मविश्वास
असायला हवा मग कोणतीच
गोष्ट अवघड नाही...
✍️AN🙏

-


17 AUG 2021 AT 6:40

अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका त्याचे कारण असे आहे......
अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही, आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही.......
✍️An🙏

-


Fetching amol nannaware Quotes