अप्रिय कोरोनास,
हो,अप्रियच कारण..
तुझ्या येण्याने जगणेच बदलले,
एकमेकांमधलं अंतर वाढले..
व्यवहार थांबले,रस्ते ओस पडले,
आमच्या सुखी आयुष्याचं चित्र पालटले..
पण तुझ्या येण्याने कळलं...
आपुलकी,प्रेम आणि माणुसकी,
आमच्यात अजूनही शिल्लक आहे..
आणि तुझ्यासारखे शेकडो जरी आले,
तरी परतवण्याची धमक आहे..
खरंतर,
सवय झाली तुझ्यासोबत जगण्याची,
ऐकून रोज तुझ्या त्याचत्या बाता,
ठरवलं आहे प्रत्येकाने..तुला घेऊनच जिंकायचं आता...
तुझ्यामुळेच आम्हाला...
नवी उमेद मिळाली,
बेधुंद होऊन पुन्हा जगण्याची..
स्वप्नांवर बिनधास्त ठेवून विश्वास,
जिद्दीनं सारं जिंकण्याची..
लक्षात घे तू एक ...
तुझ्यासारखे भलेभले अनेक,
आले आणि निघून गेले..
तू ही जा आता असाच,
तुलाही वेळेचे बोलावणे आले..
- अक्षता
-