तू किती करतेस माझ्यासाठी आणि अजूनही करतेस..बघ ना आजपण तू उपवास पकडला वटपौर्णिमेचा तेही माझ्या दिर्घ आयुष्यासाठी...पण तुझ्यासाठी मी मात्र काहीच करू शकतं नाही.. हा पण मी ही आता ठरवलं कि तुझ्यासाठी काहीतरी करायचं..... मी पण तुझ्यासाठी वटपौर्णिमाचा उपवास पकडतो...तेव्हा ती हळूच हसते आणि बोलते चला काहीतरी तुमचं पुरुष धरत नसता हा उपवास फक्त बायकांनी धरावा लागतो..? मग मी बोललो असं कोण म्हणतं,का पुरुषांनी हे व्रत करायचं नसतं..? म्हणजे पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी बायका हे व्रत करणार आणि मग तिच्या आयुष्याच्या काय ग.. आपल्या समाजात हे असचं असतं का नाही नवराबायको एकत्र ही वैकुंठाला जातं कधी बायको आधी जाते तर कधी नवरा...असं का ? पण मी ना हे व्रत करणार त्या सावित्रीने सत्यावानचे प्राण यमाकडून परत आणले म्हणून हे व्रत बायका आपल्या पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी करतात पण तिचं काय ती ही माणुसं आहे ना...त्यामुळे मी ठरवलं कि मी करणारं तुझ्यासाठी व्रत सातजन्म नाही तर करोडो जन्म तू माझीचं बायको असण्यासाठी आणि मी कायमची सोबती राहण्यासाठी मी करणार व्रर्त तुझ्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारणार फक्त तुझ्यासाठी.. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीचं स्माईल बघीतली..आणि तेव्हा ठरवलं आता आपण सुरुवात करायची तिच्यासाठी हे व्रर्त करण्यासाठी.....!
लेखन:- अभय घाटगे.©-
सुरुवात तर केली भावा,पण अडचणी आल्या खुप...तरीही परत सुरुवात केली पुन्हा नव्या अडचणी आल्या...तरीही हार मानली नाही मित्रा पुन्हा नव्या जोमाने सुरूवात केली पण तिथे अडचण अपयश..आता मात्र माझाचं धीर खचला दोस्ता...मनात अनेक नकारात्मक विचारांने जाळ विनायला सुरुवात केलेली,पण तरीही त्यातून कसातरी मार्ग काढला यार..आणि पुन्हा नव्याने सुरुवात केली,आता खात्री नाही पुर्णपणे विश्वास होता आपली हीच सुरुवात सुफळ संपूर्ण पणे पुर्ण होणार..कारण ऐवढ्या अडचणीने एकचं गोष्ट शिकवणून सोडलेली अनुभव नावाची..आता सुरुवात तर झाली आहे,यश पण दणक्यात येईल बघ मित्रा फक्त तू स्व:तालाच ओळख.....!
लेखन:- अभय घाटगे.©-
जुन ते सोन असतं मग ते प्रेमही असू शकतं...
लेखन:- अभय घाटगे©
जुन्यावाल्या Love ची गोष्ट....!-
तू फक्त इंग्रजीत बोल,इंग्रजीतच लिही,वाच मराठी काय "optional" ठेवता येईल....आपणच आपल्या मराठी भाषेला इतक परकीय समजतो कि चक्क "optional" ठेवून देतो,आणि मग असं एक दिवस स्टेटस वगैरे ठेवून मराठी असल्याचा अभिमान दाखवतो.....खरतर पहिलं आपण सुरुवात केली पाहिजे आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी.....!
लेखन:- अभय घाटगे.©
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....
— % &-
कालच ती मला म्हणाली जुळतं ते प्रेम नसतं,तर जोडतं ते प्रेम असतं...आता तुचं ठरवलं असं जुळवून घेऊन प्रेम करायचं कि एकमेकांना कायमचं सोबत जोडून प्रेम करायचं......!
लेखन:-अभय घाटगे.©
निमित्त १४ फेब्रुवारीचं.....!
— % &-
लेखक होणं म्हणजे,स्व:तालाच प्रत्येक गोष्टीत सारखे सारखे प्रश्न विचारत राहणं..आपल्या जगण्यातलं व्हिजन सतत शोधत राहणं,स्व:ता थोडसं जगावेगळं राहुन माणसांना जाणंन..आणि म्हत्वाचं म्हणजे सतत कोणत्याही गोष्टीसाठी अस्वस्थ होऊन बसणं म्हणजे लेखक होणं....!
लेखन:- अभय घाटगे.©-
आजकाल जग खुप मोठ होतं चाललंय, अन् आयुष्य मात्र कमी झालं..आणि स्वप्नं बरीचं मोठी आहे बस्स....!
लेखन:-अभय घाटगे.©-
ज्यांना गुरू असतात त्यांची काहीचं स्वप्नं नसतात,कसलीचं ध्येय नसतात.. पण ज्यांना साधा गुरूचा आर्शिवाद पण मिळतं नसतो ना त्यांची स्वप्नं आभाळाऐवढी मोठी असतात,आणि ध्येय पुथ्वीसारखी फिरत असतात... मग ते एकटेचं एकलव्यासारखं स्व:ताला घडवण्यात मात्र बरेचं व्यस्थ राहतात....!
लेखन:- अभय घाटगे.©
-
घरोघरी ती लक्ष्मी असते म्हणून तर घर उजळून निघतं..नायतर नुसता पैसा असला तर हे जगचं स्वार्थी होतं..!
लेखन:- अभय घाटगे.©
#तिचासन्मान
-