प्रिय डिसेंबर काहीच क्षण उरलेत तुझ्यासोबतचे नेहमीच असा लगबगीने येतो आणी घाईतच निघून जाते, उरतात मागे फकत आठवणी आणि असंख्य शिकवणी कधी कधी वाटतं तू जाऊच नये अन् मनाला तुझ्याशीच हरपावे..!
प्रिय डिसेंबर सरते शेवटी काहीतरी विचारायचे आहे तुला , असा कसा रे शेवट तुझा विरह आणि भेटीचे सृजन ज्यात, इतका कसा रे तू कणखर नेहमी उत्साही आणि प्रसंगी हट्टी पण स्वतः मात्र विरहाच्या डोहात बुडत चाललेला असला तरी दुसऱ्यांना पोहचवतोच मात्र पैलतीरी..!
ही रात्र नं अशीच आहे, अगदी अवखळ, निरागस, मधुर, सर्वांना आश्चर्यात पाडणारी.! आणि सर्वांत मोठी कमाल म्हणजे, ...,त्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाला स्वतः मध्ये सामावुन चांदणी सारखं चमकवते..!!
आई बाबांशी लहान सहान तक्रारी करता करता, "अगं आई कशाला गं, नको ना; सद्ध्या गरज नाहीय गं, आणि, बाबा तुम्ही कशाला काळजी करता उगीचच...? करते मी manage.." इथपर्यंतचा प्रवास कसा निघून गेला कळलच नाही...!!
पडता पडता, एक आठवण करुन गेला पुसट झालेल्या क्षणांत पुन्हा रंग भरून गेला... कानाशी येऊन हळूच बोलला, "चढताना पायऱ्या यशाच्या थोडं दूर गेले स्वतच्या! खूप काही होतं करायचं, पण, राहून गेलं थोडसं जगायचं..!" असं नको हं व्हायला...