सुसंगतीचा परिणाम होई असा
सदा जीवनाची उमलती कळी...
मनात सर्वदूर पसरलेल्या विषावर
संजीवनी ठरलेली अमृताची गोळी...
सहवास त्यांचा असा जणू
प्रखरता शमते मनातील विकारांचे...
पाप, कुविचार घेती शोषून सर्व अन्
भाव शुद्ध वसता सार्थ होते जन्मांचे...
वावरलो विषयात आपण जरी
सत्संगी करे परावृत्त तयापासून...
निर्भयता गुण लाभे जीवनात
'मी' पणा नं उरता मुक्त होई भयापासून...
नि:संशय आपली कर्म करतात असता
शंका नं उरे मनी असला जरी उणे काढणारा ...
गोड वाणी, मृदू, सर्वांचा हितकारी असता
मऊसूत लोण्यासम वाटे तो सर्वांना खुपणारा...
कु. शोभा मानवटकर...
-