शब्द घेतात समजून आपल्याला
लिहिण्यातून खरी मोकळीकता मिळते..
मनाला न पटणाऱ्या परिस्थितीतही मग
केलेली कविता आपली सोबत करते..
जीवनाची खरी स्पष्टता दरवेळी आपल्याला,
अचानक सुचलेल्या लिखाणातूनच कळते..
जीवन असतंच यार सुख दुःखात गुरफटणारं
त्याची खरी गंम्मत त्याला आवर्जून लिहूनच कळते..-
अनुभवावीण न सांगावी |गोष्ट कोणा निरर्थक |
नुसत... read more
निरोपाचा हा क्षणच का आयुष्यात,
दुराव्यात मग खऱ्या प्रेमाची पावतीवजा उत्तरे मिळाली..
बोथटलेल्या दुःखाना स्थानच का आयुष्यात,
घुसमटलेल्या श्वासांना मग ओघळणाऱ्या अश्रुंतुन उत्तरे मिळाली..-
उगाच छळतो आपण स्वतःला,सगळं काही आधीच ठरलेलं असतं..
कोण किती काळ सोबत आपल्या हे आयुष्याच्या पाटीवर कोरलेलं असतं.
मन जिथे सतत रमत असतं तेच नेमकं तात्पुरतं आपल्या आयुष्यात असतं..
कळलंय आयुष्य जरासं मला .. इथे सारं काही क्षणभंगुर असतं.....
-
प्रश्न अनेक मनात, कधी स्वतःला तर कधी जीवनाला कोसते आहे,
काय साला आयुष्य झालंय मनाविरुद्ध जगण्यात आयुष्य रेटते आहे..
स्वतःचं स्वतःशी बडबडत मनातील गोंगाट रोज ऐकते आहे..
हवं असणाऱ्या आयुष्याची स्वप्नं रंगवत रोज कविता रचते आहे..
कधी दुनियेला तर कधी अस्तित्व नसल्या नशिबाला भांडते आहे,
हे भांडणं बी निरर्थक च म्हणा तरी मनाविरुद्ध जगणं अनुभवते आहे.
हे नको ते हवं होतं असं सतत वाटणाऱ्या मनाला आज हसते आहे..
जातच माझी माणसाची मनाविरुद्ध जगण्यात पण रोज अपूर्ण स्वप्न जगते आहे..-
आपलं आपल्यासाठी किंवा इतर लोकांसाठी उरणं सुरु होतं तेव्हा आपण करत असलेलं प्रेम कमी होतं चाललय असं समजावं.
-
काही वेळा सुख आणि दुःख दोन्ही आपल्या आयुष्यात जगत असलेल्या प्रत्येक क्षणात समानतेने वास करत असतं. या दोघांपैकी कुणाला जवळ करायचंय हे आपलं आपण ठरवायचं असतं.
-
फक्त ध्येय साध्य होईपर्यंत आपण एकटं चालायचं असतं.ध्येय साध्य होण्याच्या जवळ येऊन ठेपलेला काळ अत्यंत कठीण असतो. तो इतका कठीण की ते ध्येय सोडून द्यावं की काय अशी परिस्थिती आपल्यासमोर निर्माण होते पण त्या परिस्थितीपुढे हारून न जाता फक्त ठरवलेलं ध्येय गाठण्यावर स्वतःचं लक्ष केंद्रित करायचं असतं. हे जमलं की आपली ध्येयप्राप्ती आणि प्रतिकूल परिस्थितीवर विजय निश्चित..
-
खऱ्या प्रेमाला जीवापाड जीव लावून जगलेल्या नात्याला अपूर्णतेचा शाप असतो. त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्या विशेष व्यक्तिशिवाय आयुष्य भर जळत राहणं नाहीतर परिस्थितीमागे ती नेईल तिकडे पळत राहणं असतं.
-
मिळालंय त्यात नाही समाधान,निसटत चाललंय त्यात गुरफटून दुःखी आहे,
माणूस आजकाल माणूस नाही राहिला, तरीही माणूस माणसाच्या शोधात आहे.
जीवापाड प्रेम करूनही एकटेपणा, कर्तव्य पालन म्हणुन लग्नबंधनात अडकतो आहे..
निस्वार्थी होऊन जगणारं असेल का कोणी? या विचारातच माणूस माणसाच्या शोधात आहे.
दुःखाला कंटाळून मरणाला मिठी विचार रोज पाहुणा म्हणुन मनाचे दार ठोठावत आहे.
फक्त समजून घेऊन द्यावा निस्वार्थी आधार याच अपेक्षेत माणूस माणसाच्या शोधात आहे.
हारून प्रेमात इच्छा संपल्या मनात जगण्या मरण्याचा रोज खेळ सुरु आहे.
देवाकडे जे मागून मिळेना त्या अपेक्षा पुर्तीकरता माणूस माणसाच्या शोधात आहे..
वाटते कळले आता आयुष्य सारे तोवर नवा धडा तयार त्याच्याकडे आहे.
प्रेमाची अपूर्णता जगत असलेला व्यक्ती मात्र कित्येकपटीने दूर स्वतःमध्येच गुरफटलेला आहे.-