........
-
अनुभवावीण न सांगावी |गोष्ट कोणा निरर्थक |
नुसत... read more
मुरलेली नकरात्मकता नी सडलेलं रितेपण पेट घेतात जेव्हा,
उठलेले आगीचे लोळ मनाचा सारा आसमंत काबीज करून घेतात.
त्याच आगीने धुरकटलेलं मन मग शोधू लागतं रितं होण्या अनेक वाटा.
आणि भडकतो मग शब्दांचा वणवा असा राख साऱ्या दुःखाची होते..-
मनातील दाह शमवन्या तुझी लिहिली एक ओळ पुरेशी आहे..
घडले बिघडले सोडले मागेच आता नव्याने एक जीवन रचायचे आहे..-
मनात शांती अनुभवते आहे.. ध्यान करण्या मुळे मनातील नकारात्मकतेचं प्रमाण फार फार कमी झालंय. जेव्हा पासून पॉसिटीव्ह माईंडसेट झाला आहे तेव्हा पासून प्रत्येक गोष्टीकडे पाहण्यासाठी साठी एक वेगळाच दृष्टिकोन जन्मला आहे.. ज्यातून मला फक्त नी फक्त समाधान आणि शांतीच मिळते. मनात ज्या ज्या गोष्टींबद्दल भीती निर्माण होत होती ती बऱ्याच अंशी कमी झाली आहे. प्रत्येक गोष्टीकडे डोळस वृतीने बघून निर्णय घेणं बऱ्यापैकी जमू लागलं आहे. मला एक गोष्ट समजलीय आपण स्वतःला जेवढं मोकळं सोडू तेवढी उंच भरारी आपण घेऊ शकतो त्यामुळे मनात कोणत्याच प्रकारची भिंती निर्माण होत नाही. माझ्या मध्ये काहीही करण्याची भरपूर क्षमता आहे. जी क्षमता माझं उत्तरोउत्तर उत्तम व्यक्तिमत्व घडवते आहे.जे ब्रम्हांड मला मदत करते आहे त्याचे मनापासून खूप खूप आभार..
-
मोहाचा पडे पीळ जेव्हा अकारण अघटित काहीतरी घडून येते
दुःख मिळते तेवढेच आपल्याला जेवढे भोगने आपल्या नशिबी असते.
ठरवून ठेवतो बरेच काही आपण पण ठरवलेले एक ना एक दिवस विस्कटत जाते..
चांगल्याचीच परीक्षा अगणित पण त्यातूनही सुटका हळुवार होऊन जाते..
कळलेय खरच मला आता एका अज्ञात शक्तीचे वर्चस्व आपल्या विचारांपलीकडे असते..-
कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी जेव्हा आपण त्यावर पैसे मोजतो तेव्हा ते पैसे आपण खर्च करत नसतो तर ते पैसे आपण इन्व्हेस्ट करत असतो.. आणि ही इन्व्हेस्टमेंट कधीच तोट्यात नसते आणि तिचे रिटर्न्स मात्र अनलिमिटेड असतात.. फक्त ती इन्व्हेस्टमेंट आपण अनुभवी आणि प्रामाणिक व्यक्तीजवळ करतोय याची शाश्वती आपल्याला असली की आपल्याला यामध्ये १००% नफाच मिळतो.
-
गमवलेली व्यक्ती शोधता शोधता आपण स्वतःला हरवायचं नसतं.
काळ संपला नात्याचा की ते क्षणभरही आपल्या आयुष्यात थांबत नसतं..
करावं काय नी जगावं कसं त्या व्यक्तिशिवाय हे प्रश्नांचं वादळ भनभनत असतं..
विचारांना द्यावा थोडा विराम तेव्हा जीवनाचं पुढचं चित्र स्पष्ट होत असतं...
-
आताशा कुठे जीवन कळले आहे, थोडी ओंजळ भरलेली खूप काही निखळले आहे..
शांतता, स्थिरता,समाधान हे शब्द वाचनात येतात आता आयुष्याला माझ्या जणू यांनी राम राम ठोकला आहे.
का कुणास ठऊक जे करायचं होतं ते सारं सारं करून झालय तरीही एका अपूर्णतेने मन सुन्न आहे..
विरह जगता जगता होरपळून निघायलय जीवन या प्रेमानं, कोणत्या कवीने म्हंटलय प्रेम सुंदर आहे??
कलेशी खुणगाठ बांधून जगलेल्या प्रत्येक शब्दांत पुन्हा पुन्हा शोधते स्वतःला, हे शोधणे देखील आता निरर्थक वाटते आहे...
वय सरण्याआधी आयुष्य पळत सुटलं इतकं की माघारी फिरणं देखील आता अपराधी वाटतं आहे.
सारं आयुष्य बदलण्याची ताकद असते म्हणे एका प्रेम केलेल्या व्यक्तीत, खरंच का हे वक्तव्य आज मला पुरेपूर लागू पडते आहे??-
नातं तुटण्याआधी, तुटताना आणि तुटल्यानंतर प्रत्येकच्या मनात ते नातं तुटू नये अशा भावना असलेलं, त्या नात्यासाठी बरंच काही सांगण्यासारखं असतं फक्त ही प्रक्रिया घडून येताना अपुरी पडते ती समजून घेऊन एकमेकांचं शांत मनाने ऐकून घेण्याची इच्छा
-