आताशा कुठे जीवन कळले आहे, थोडी ओंजळ भरलेली खूप काही निखळले आहे..
शांतता, स्थिरता,समाधान हे शब्द वाचनात येतात आता आयुष्याला माझ्या जणू यांनी राम राम ठोकला आहे.
का कुणास ठऊक जे करायचं होतं ते सारं सारं करून झालय तरीही एका अपूर्णतेने मन सुन्न आहे..
विरह जगता जगता होरपळून निघायलय जीवन या प्रेमानं, कोणत्या कवीने म्हंटलय प्रेम सुंदर आहे??
कलेशी खुणगाठ बांधून जगलेल्या प्रत्येक शब्दांत पुन्हा पुन्हा शोधते स्वतःला, हे शोधणे देखील आता निरर्थक वाटते आहे...
वय सरण्याआधी आयुष्य पळत सुटलं इतकं की माघारी फिरणं देखील आता अपराधी वाटतं आहे.
सारं आयुष्य बदलण्याची ताकद असते म्हणे एका प्रेम केलेल्या व्यक्तीत, खरंच का हे वक्तव्य आज मला पुरेपूर लागू पडते आहे??-
अनुभवावीण न सांगावी |गोष्ट कोणा निरर्थक |
नुसत... read more
नातं तुटण्याआधी, तुटताना आणि तुटल्यानंतर प्रत्येकच्या मनात ते नातं तुटू नये अशा भावना असलेलं, त्या नात्यासाठी बरंच काही सांगण्यासारखं असतं फक्त ही प्रक्रिया घडून येताना अपुरी पडते ती समजून घेऊन एकमेकांचं शांत मनाने ऐकून घेण्याची इच्छा
-
जेवढं लोकं फ्री मध्ये मिळतंय म्हणुन पैसे वाचवण्याचा
अट्टाहास करून लोकांच्या मागे लागत राहतात तेवढा
अट्टाहास पैसे कमवण्यासाठी केला तर
कोणच गरीब म्हणुन राहणार नाही...😄
काही प्रसंग आणि माणसं.बरंच काही शिकवून जात असतात.-
कुणाला तरी कधीतरी आपली साथ हवी असते आणि
ती आपण देतो ही साथ देताना काही प्रमाणात आपलं नुकसान होत असतं ते शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक असू शकतं पण आपली साथ देतानाची भावना निखळ आणि समोरच्याला त्याच्या संकटातूम बाहेर काढणारी असेल तर ती साथ देणं सार्थकी लागतं. आपलं झालेलं नुकसान कधीतरी कुठेतरी आपल्याच सोबत चांगलं काहीतरी घडून येऊन भरून निघत असतं. कुणाकडून तरी खूप कळकळीने आपल्याला साथ मागितली जाणं आणि ती साथ निखळ भावनेने आपल्याकडून दिली जाणं यात नियतीनी आखलेल्या आणि आपल्याच बाबतीत पुढं जाऊन चांगलं काही घडवून आणणाऱ्या गोष्टींच हे साथ देणं सार असतं.-
शब्द घेतात समजून आपल्याला
लिहिण्यातून खरी मोकळीकता मिळते..
मनाला न पटणाऱ्या परिस्थितीतही मग
केलेली कविता आपली सोबत करते..
जीवनाची खरी स्पष्टता दरवेळी आपल्याला,
अचानक सुचलेल्या लिखाणातूनच कळते..
जीवन असतंच यार सुख दुःखात गुरफटणारं
त्याची खरी गंम्मत त्याला आवर्जून लिहूनच कळते..-
निरोपाचा हा क्षणच का आयुष्यात,
दुराव्यात मग खऱ्या प्रेमाची पावतीवजा उत्तरे मिळाली..
बोथटलेल्या दुःखाना स्थानच का आयुष्यात,
घुसमटलेल्या श्वासांना मग ओघळणाऱ्या अश्रुंतुन उत्तरे मिळाली..-
उगाच छळतो आपण स्वतःला,सगळं काही आधीच ठरलेलं असतं..
कोण किती काळ सोबत आपल्या हे आयुष्याच्या पाटीवर कोरलेलं असतं.
मन जिथे सतत रमत असतं तेच नेमकं तात्पुरतं आपल्या आयुष्यात असतं..
कळलंय आयुष्य जरासं मला .. इथे सारं काही क्षणभंगुर असतं.....
-
प्रश्न अनेक मनात, कधी स्वतःला तर कधी जीवनाला कोसते आहे,
काय साला आयुष्य झालंय मनाविरुद्ध जगण्यात आयुष्य रेटते आहे..
स्वतःचं स्वतःशी बडबडत मनातील गोंगाट रोज ऐकते आहे..
हवं असणाऱ्या आयुष्याची स्वप्नं रंगवत रोज कविता रचते आहे..
कधी दुनियेला तर कधी अस्तित्व नसल्या नशिबाला भांडते आहे,
हे भांडणं बी निरर्थक च म्हणा तरी मनाविरुद्ध जगणं अनुभवते आहे.
हे नको ते हवं होतं असं सतत वाटणाऱ्या मनाला आज हसते आहे..
जातच माझी माणसाची मनाविरुद्ध जगण्यात पण रोज अपूर्ण स्वप्न जगते आहे..-
आपलं आपल्यासाठी किंवा इतर लोकांसाठी उरणं सुरु होतं तेव्हा आपण करत असलेलं प्रेम कमी होतं चाललय असं समजावं.
-