वेदनांना मोकळी वाट करून दे. तोड अन्यायाचे पाश तू, आसवांना अंगाराची साथ करून दे. आहे सारे तुझ्याच हाती, मनगटात तुझ्या थोडा जोर येऊ दे. तूच आहेस तुझी शिल्पकार, विश्वास थोडा मनात असू दे...
अंधविश्वास हा कालांतराने आत्मविश्वास डळमळीत व्हायला कारणीभूत ठरतो. ही अशी पट्टी डोळ्यांवर असली , की सत्यसुध्धा असत्य भासू लागते. काही वेळ गेल्यावर यातला फोलपणा आपल्याला लक्षात येतो, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो.
एकमेकांची मने कलूषित करून संबंध दूषित करण्यापेक्षा एकमेकांना प्रोत्साहन देणे जास्त महत्त्वाचे आहे. आपल्या वाट्याचे दुसरा कोणी हिरावून तर घेणार नाही ना ? हा प्रश्न माणसाला दुबळा आणि सामर्थ्यहीन बनवतो. मनात जिद्द आणि हातात रग असेल तर मोठमोठी आव्हानेही सहज पेलता येतात. गरज आहे फक्त आणि फक्त आत्मविश्र्वासाची...
काही दिले, काही द्यायचे होते. नाही मागितले कधी तू , परी जीवन त्यासाठीच व्यर्थीले होते. माझे मलाच उमजले नाही, तुलाच का साऱ्याला मुकायचे होते ? फुलणारी कळी कुस्करली गेली, तिला अजून बरेच फुलायचे होते. सात्विक सुरेख रांगोळी विस्कटली गेली, जिला अंगण सजवायचे होते. का केलीस काहीली जीवाची, सुटायचे यातनातून तुझ्या हातात होते. आले नशिबी भोग म्हणून का तुलाच एकटीला जळायचे होते?
वो बीते हुए खयाल वापस आते है. कुछ रह गया था शायद उनका, इसी बहाने दिल को टटोलकर जाते है. रात बीतती जाती है फिर, अपने ही फ़िराक मैं. हम जागते रहते है, उलझकर किसी खयाल मैं. आना तय है जिसका, उसे जाना ही है. लेकिन आने और जाने के बीच में, जो उलझन होती है, उसे सुलझने में रात बीत जाती है. हम राह तकते है उस नींद की, जो आते आते रह जाती है....