आयुष्यातील अनुभव,
अनेक गोष्टी शिकवतात.
आपलं कोण, परकं कोण,
वेळेनुसार समजतात.
सुखाच्या क्षणात,
खूप लोक सहभाग घेतात.
दुःखाच्या वेळी मात्र,
अचानक गायब होतात.
गरजेच्यावेळी आपल्याला आठवणारे,
खूप लोक असतात.
पण गरज नसताना देखील, आपलेपणा दाखवणारे,
क्वचीतच काहीजण असतात.
म्हणूनच अशा लोकांना जपा,
ज्यांना तुमची किंमत आहे.
नाहीतर तुमचा फायदा घ्यायला,
साऱ्या दुनियेची हिंमत आहे.
- शरयू निलवर्ण
-