अपेक्षा ठेऊ नये आणि अटी घालू नये, अपेक्षाभंग-नी-अटी अमान्य होऊ नये..
अपेक्षा
मान्य आहे, अपेक्षा असणं वाईट नाही, परंतू त्या पूर्ण होतीलच हे जरूरी नसते..
सारी गोम तिथेच तर, नको तिथे नडते, मग काय म्हणायचे, घडू नये तेच घडते..
अपेक्षाभंग म्हणजे जीवन भरचा त्रास, कारण त्याचे, जपलेला एकतर्फी भास..
अपेक्षा म्हणजे, कपोलकल्पित आभास, वाटू लागतो, कदाचित् गळी पडलेला फास
अट...
एका अटीवरच फक्त मी मान्य करणार, असा संवाद, शब्दांना कितपत तरणार..
कुणास ठाऊक अटीवर तुम्ही जिंकणार, की त्यामुळेच अपेक्षाभंग होऊन हरणार..
पुढे येणार्या वेळेनुसार भविष्य ठरणार, अट मान्य की, हरण्याचे मोल भरणार..
मनाचा त्रागा न करता, अटी घालू नका, "नीर" विचारतो तुम्ही काय करणार..
-