कितीही आणि काहीही झालं तरी
हार मानायची नाही पुन्हा उठायचं
गेलेलं सारं अवसानं परत आणत
स्वतःच स्वतःसाठी एकदा नव्याने लढायचं
खूपच हतबल झाल्यासारखं झालं तर
प्रवासात छोटासा स्वल्पविराम घ्यायचा
पण पूर्णविराम न घेता त्या प्रवासाला
पुन्हा नव्याने एक सोयीस्कर मार्ग द्यायचा
या प्रवासात अनेक लोक समोर येतील
ज्यांच्यामुळे जगण्याचे नवीन अर्थ कळतील
काही आपल्या फायद्याचे असतील तर काही तोट्याचे
ते सारे सोबत घ्यायचे कारण प्रत्येकातून काही न काही अनुभव मिळतील
शेवटी काय तर खडतर असो किंवा सोप्पा
हा मार्ग तर आपण सर करायचा
कोणाला बोलून नाही तर स्वतःच्या कर्तृत्वाने
आपला कोणी कधी न पाहिलेला चेहरा समोर आणायचा...
शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे - सोनावणे
-