सत्तेचं राजकारण...
क्षणाक्षणाला बदलतंय इथे सत्तेचं राजकारण,
जनता मात्र बघतेय त्यांच्याकडे आस लावून...
या सत्तेच्या दावेदारांना नाही कुणाचं सोयरसुतक,
ओल्या दुष्काळात शेतकरी होरपळतोय आणि महागाईने नागरिक झालाय त्रस्त...
प्रत्येक जण राजकारणात स्वतःची भाजतोय पोळी,
एका राजाला दुसरा राजा शह देण्यासाठी खेळतोय बुद्धीबळाची खेळी...
बळ आणि बुद्धीचा कस लावतोय इथे प्रत्येक जण
काळजी नाही यात सामान्य जनतेची,
आहे फक्त धडपड स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याची...
-