बालपण होत आमच छान,
पिंजारुन टाकत होतो सगळ रान.
रानामध्ये जाऊन करत होतो फीस्ट.
क्षणादार्थ सगळ करायचो आम्ही फस्त.
अंगान बनलो होतो आम्ही धष्ट पुष्ट.
खेळ होते खुप मजेदार आवड होती त्यांची फार.
कधी सुर पारंबी, तर कधी चेंडुफळी
तर कधी लपंडाव, तर कधी पळापळी,
कधी हु तु तु , तर कधी विठीदांडी
कधी रुमाल पाणी, तर कधी सापसिडी.
दुकानात मिळत असे लिमलेटची गोळी
ती खाण्याची गंमत निराळी
सोबत असायची मित्रांची टोळी,
होती सारी मनान साधी भोळी
नव्हत कधी जात पातीच बंधन,
नव्हता कधी कपटी भाव, निरागस होत मन.
नसायच कधी मैत्रीमध्ये राजकारण.
मित्र आम्ही सारे एकमेकांचे जीव की प्राण.
पाहुन लहानांना, हरपते भान.
आठवून बालपण, प्रसन्न होते मन.
पुन्हा एकदा जगाव बालपण,
वाटुन जाते मनाला काही क्षण..
-