कुठल्याही नात्यात माणूस दुसऱ्याला loyalty चा आरसा दाखवताना स्वतः मात्र त्या आरशात बघायच विसरतो .
खरतर नात्यात समज-गैरसमज वाद-विवाद होतच असतात, लोक मग कोणीही घ्या त्यात आपण स्वतः सुद्धा येतो, कारण आपण म्हणतो लोक असे आहेत लोक तसे आहेत ,पण इतरांसाठी पण आपण एक लोक म्हणूनच असतो, हे लक्षात घ्यायला हवे, आपण सरळ दुसर्याला दोष देऊन मोकळे होतो, काही नात्यांत कधी स्वतः साठी तर कधी कुटुंबातील आपल्या माणसांची बाजू घेऊन आणि दुसऱ्याची योग्यता काढून मोकळे पण होतो, पण कोणी हे कधीच मान्य करत नाही की आपल नाही तर, कमीतकमी आपल्या माणसांच पण काहीतरी चुकलेल असू शकेल,
दुसऱ्याकडे दोषाचे एक बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे असतात हे मात्र प्रत्येकजण सोयीस्कररीत्या विसरतो ..।
-