तोडलेली झाडे , मैदान साफ आहे....
अन् शेतकर्याला इथे मृत्युचा शाप आहे...
टाळुवरचे लोणी पसरे इथे तिथे,
अन् धोरणांचा रोज लिलाव होत आहे....
घामाच्या धारांनी अभिषेक केला,
तरी धरणीमाय कोरडीच का राहे?
बरसु दे सरी , का रे आखडता हात?
चातकाप्रमाणे तुझी वाट इथे पाहे....
होऊ दे पिकपाणी नाहीतर माघार आहे,
पुन्हा माझ्यापरी दुसरा निराधार आहे....
अश्विनी अभिजीत
-