कशातच समाधान नाही,
हे समजुन दुःख आपण मिरवतो।
सुंदर आणि आकर्षक एक मानुन,
आपण निर्णय चुकीचा घेतो।।
सुंदर असण्यापेक्षा समाज,
सुंदर दिसण्याला जास्त कल देतो।
सुख बघण्याचा दृष्टिकोन न ठेवता,
कालांतरानं दुःखाचे वारे झेलतो।।
सुख हे नेहमी भोगण्यापेक्षा,
समजण्यात अधिक असतं।
ह्याची जाणीव सतत व्हायला,
काहीतरी ध्येय असावं लागतं।।
एखादी गोष्ट मिळावी म्हणून,
दुःख बाळगून तिच्या मागे लागतो।
ज्या क्षणी ती आपल्याला मिळते,
तो खरा सुखाचा क्षण असतो।
-