अडीच अक्षरांचं महत्व
फक्त हृदय चांगलं जाणते..
स्पंदनेत धडधणाऱ्या प्रेमाला
नेहमी अवतीभवती पाहते..
श्वासातील प्रत्येक श्वासही
जगण्याचे तेच कारण बनते..
रात्रीत पाहणाऱ्या स्वप्नांमध्ये
हृदयस्पर्शी प्रेमकथा दाखवते..
कधीकधी निशब्द एकांतात
आठवणीच्या गावी घेऊन जाते..
पापण्याचे बंद करून कवाड
मुखावर हास्य,आसवे तारते..
या अडीच अक्षरातचं आपण
आपले आयुष्य जगत असतो..
सुख,दुःखाचे क्षण घेऊन साथीला
आपल्या प्रेमाला जपत राहतो..
-