शाळेतले प्रेम कधी अनुभवलेच नाही
पुस्तकांच्या पलिकडे कधी वळलेच नाही
केले मी प्रेम फक्त पुस्तकांवर, कारण
त्यांनी कधी विश्वासघात केलाच नाही
दिले त्यांनी ज्ञान, दिली शिकवण जगाची
फसवेगिरीच्या जगात कधी वळूच दिले नाही
दहावीत दुसरा क्रमांक प्राप्त करून वाढली शान
मिळाला सन्मान, वाटला परिवाराला अभिमान
-