आपल्यामधेच आहे सुखसमाधान सारे
हे समजू नाही मी शकलो,
कस्तुरी महत्त्वाकांक्षेची मी
या दुनियेत पारखत बसलो|
रानावनात हिंडलो मी पोट फुटेपर्यंत धावलो,
प्रत्येक गोष्ट माझी करून घेण्यासाठी
सर्वस्व गमावून बसलो|
कस्तुरी मागे धावताना आता थकलोय फार,
समाधान चे दिवस आता जगेन म्हणतो चार|
माझ्या जीवनाचे शहाणे बोल इतरांना सांगत राहीन,
माझ्या स्वप्नांची कस्तुरी या कृतार्थातच पाहीन|
-