प्रत्येक गोष्टीतील तोडगा निघतो
मग लालपरिलाच का दुरावतो....?
४वर्षाआधीही दाबले होते आंदोलन
या वर्षीही होणार का असे कोण आहे सहमत...?
स्वतःच्या रक्ताने लिहीले मुख्यमंञ्याना ,
निलंबित करणे हाच आहे मग
तोडगा का कळत नाही शासनाला...
नोटिस बजावली कामावर नाही आले तर काढून टाकेन ,
ड्रायव्हर कंडक्टर सर्वांचे हाल बेहाल झालेत...
15 दिवस झाले आंदोलन पाठिंबा मिळाले ,
पण होत दिखाव्यासाठी फक्त त्यांनीही पाठ फिरवले...
40-50 प्रवाशांची जबाबदारी त्यांच्यावर असते ,
1 मिनिटांचा जर क्षण तो आला
त्यांचे काय हाल असे, कुणास कळते असे....
रहायला नाही सुविधा काही घरापासून दूर राही ,
हजारो कर्मचारीही दुखावले गेले
पण माञ हे आंदोलन कसे दाबून टाकेल....
तोडगा काय निघतो यावर स्री पुरूष कंडक्टर असेल,
तर सकाळी ड्युटीवर
घरी जात का नाही कुणाला ठाऊक...
दिवाळीत तिकीट वाढ केली
पण त्यांच्या मागण्याला अंधारात ढकलले,
हजारो कर्मचाऱ्यांना निलंबित केले
काय करणार कुठे जाणार
कसे कोणासाठी जगणार नाही कळले...
घरातील मुलबाळ घेऊन
आयाही आंदोलनात सहभागी झाले,
सर्वांच्याच मागण्या पूर्ण होतात
मग लालपरीच्याच का नाही पेन्शन नाही पगार वाढ नाही
प्रणाली चौधरी
-