पाणी
जल हेच जीवन आहे, पुरातन काळापासून ऐकत आलो. पाणी हे अनमोल आहे मग का बरं अपव्यय करून राहीलो. ते दिवस दूर नाहीत, जेव्हा पाण्यासाठी युद्ध होतील. पाण्याच्या टाकीलाही, तिजोरी सारखे कुलूप येतील. कारणीभूत आपणच आहोत, पाण्याच्या दुर्भिक्षाला. गैरवापराचा बेधुंदपणा, आपल्या जीवावर बेतला. रस्ते रुंदीकरणासाठी, मोठमोठी झाडे आपण तोडली. पण त्याच्या बाजूला, नवीन लागवड नाही केली. आधुनिकीकरणासाठी सिमेंट काँक्रीटच जंगल वाढलं. पण मोकळ्या जागेवर, वृक्ष लावन नाही जमल. आपल्या नैसर्गिक संसाधनांना, आपणच नष्ट केलं. बागायती शेतीवर, आलिशान मकान उभ केल. वाढत्या लोकसंख्येवर नाही ठेवलं नियंत्रण. तहान लागल्यावर पाण्यासाठी पळवतो अश्व.
- सौ छाया राठी
-