पुन्हा एक वर्ष सरले सरतेशेवटी आलेले कडू गोड अनुभव घेवुन आयुष्याचा प्रवास पुन्हा नव्याने अनुभवायचा... पुन्हा एक नवं कोर पुस्तक रुपी वर्ष ज्याचं त्याचं नव्याने लिहायचं... आणि आपला प्रवास चालू ठेवायचा.. अशाच एका प्रवासाठी शुभेच्छा...
अस एक नात... ज्याला देवाला रक्तात सुद्धा बांधता आले नाही तर ते मी शब्दात कसं मांडावं... अस एक नात.. ज्याला बांधण्यासाठी खरतर कुठल्याही बँड्ची गरज नाही तर ते फक्त आणि फक्त मनाने बांधता यायला हवं...
मैत्रीदिनाच्या माझ्या सर्व मित्रपरिवाराला खुप शुभेच्छा....
नवीन वाक्याला अर्थ तेव्हाच येतो जेव्हा आधीच्या वाक्याला योग्य ठिकाणी पूर्णविराम लागतो... आयुष्याच ही काहीस असच आहे काही गोष्टींना योग्यवेळी पूर्णविराम दिला की पुढच्या गोष्टी खऱ्या अर्थाने जगता येतात...