....दुष्काळ....
पाऊस येईल म्हणता म्हणता पडलाय दुष्काळ,
डोक्यावरू रोजच फक्त
पळतय आभाळ .
रानोरानी पाणी शोधतायत गुरंढोरं,
का लावलायस पावसा आमच्या जीवाला घोर.
काळ्या आईपासून का जातोस दूरदूर ,
पडला दुष्काळ डोळ्यांमध्ये येतोय पूर
बांधांवर नाही कोठे हिरवी काडी , डोंगरावर उगेचच भासे हिरवी झाडी.
किलबिल झाली पक्ष्यांची शांत, का पाहतोयस पावसा असा आमचा अंत.
पाण्यावाचून माती झाली आक्राळ-विक्राळ ,
पावसा तुझ्याच हातात आहे आमचा भविष्यकाळ .
पावसा तुझ्याविना कासाविस झाला आमचा प्राण,
हे पावसा बरस नाहीतर तुला माझ्या जीवाची आण.
-